लवकरच येत्या काही दिवसांतच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये ओबीसी आरक्षण देण्याचा सरकारचा विचार होता, त्यासाठी ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र, आता या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आली आहे. हा अध्यादेश लागू करता येणार नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे आरक्षण लागू होणार नाहीये. जोपर्यंत योग्य डेटा आयोगाकडून अथवा समितीकडून मिळत नाही, तोवर हे आरक्षण लागू करत येणार नाही. हा 27 आकडा कशाच्या आधारावर आणला, याबाबत पुरेसा पुरावा मिळत नाही, तोवर हा अध्यादेश लागू करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.

0 Comments