शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष मा. संदिप दादा बेडसे यांच्या अथक प्रयत्नाने शिंदखेडा
तालुक्यातील ८ व नंदुरबार जिल्ह्यातील १४ उपसा जलसिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी ११५ कोटी रु. मंजूर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची प्रलंबित समस्या मार्गी लावल्यामुळे हा सत्काराचा कार्यक्रम मौजे धमाणे येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपस्थित विंध्यासिनी उसिंयो चे उपाध्यक्ष जिजाबराव गोरख पाटील धमाणे, निळकंठ पुंडलिक पाटील कुरकवाडे, दिलीपराव पतंगराव कदंमबाडे, रविंद्र निंबा पाटील, साहेबराव पेढारकर विरदेल, भानुदास बळीराम पाटील कुरकवाडे, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, ग्रा.पं. सदस्य सुजीत पाटील, परमानंद पाटील धमाणे, माजी सरपंच ॲड. प्रशात पाटील, माजी उपसरपंच भगवंतराव पाटील (आबा मुंडे), लोहगाव सरपंच महेंद्र पाटील, एम पी बापु विरदेल, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, दिपक जगताप ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष, दिपक दादा गिरासे शिदखेडा विधानसभा क्षेत्र प्रमुख, दयाराम कुंवर सर दोडाईचा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष, चिराग माळी तालुका युवक अध्यक्ष, दुर्गेश पाटील युवक विधानसभा क्षेत्रप्रमुख, किसान सेलचे गुलाबराव पाटील, सुरेश अहिरराव माजी सरपंच खलाणे, राजेंद्र पाटील गोराणे, महेंद्र सिसोदे नरडाणा, हिमांशू पाटील व धमाणे ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक जेष्ठ शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारचे, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा पवार, राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना. जयंतरावजी पाटील साहेब, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री मा. एकनाथरावजी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाणीदार नेते मा. संदीप दादा बेडसे यांचे आभार मानले. या योजनेचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होऊन तालुका सुजलाम सुफलाम होणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.


0 Comments