आला आहे. त्यानुसार आजपासून भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या माध्यमातून शहरातील सर्व ठेविदार व खातेदार यांचे पैसे परत मिळावे यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शिंदखेडा शहरातील भोईराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोट्यवधी रुपयांचा भष्टाचार उघडकीस आला असून, त्यात मॅनेजर सुनील वाडिले व संचालक विजय महाले यांना अटक देखील झाली होती. त्यांची जामिनावर सुटका झाली असून आज मोकाट फिरत आहेत आमचे कुणीही काहीही करू शकत अशा आविर्भावात ठेविदारांना धम देत तुमचे पैसे नाही मिळणार आमची लाईन मोठी आहे असे वागत आहेत. म्हणून संतप्त झालेल्या ठेवेदारांनी आधीच तहसीलदार तसेच सहाय्यक निबंधक संजय गिते व प्रशासक यांना निवेदन दिले होते म्हणून सबुरीचा मार्ग निश्चित करण्यासाठी मागील आठवड्यात सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी प्रशासक कोकणी व भिल समाज विकास मंचचे अध्यक्ष दिपक अहिरे व ठेविदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आठ दिवसांच्या आत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असताना कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.मॅनेजर व संचालक मंडळ मोकाट फिरत आहेत म्हणून त्यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी हयाद्वारे ठेविदारांनी केली आहे. ह्यासाठी वरीष्ठ सहकार क्षेत्राने लक्ष केंद्रित करून संबंधित तिढा दुर करावा कारण प्रशासक व सहाय्यक निबंधक कार्यालय काय गुड आहे समजत नाही म्हणून यांचीही चौकशी केली जावी. जोपर्यंत ठेविदारांना न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय भिल समाज विकास मंचचे अध्यक्ष दिपक अहिरे सह ठेवेदार खातेदार यांनी केला आहे. ह्यावेळी अध्यक्ष दिपक अहिरे, सुनील सोनवणे, श्रावण मराठे, चंद्रकांत सोनवणे, बानुबाई भिल, हिराबाई परदेशी, शोभा कनोजिया,पानाबाई भिल, महेंद्र परदेशी, प्रकाश देवरे, रोहित परदेशी, प्रवीण मोरे, किशोर चौधरी, देविदास शिंपी,गोलु कनोजिया,मिठाराम बडगुजर, दुर्गाबाई बडगुजर,शरद बडगुजर, पुष्पाताई बडगुजर यांसह सर्व ठेविदार धरणे आंदोलन स्थळी हजर होते. अनेक शहरांतील पदाधिकारी माजी सभापती प्रा सुरेश देसले, राहुल पाटोळे,अर्जन सोनवणे, राहुल पाटोळे, राजेश मालचे,किरण थोरात,प्रा.निरंजन वेंदे, अशोक मालचे, आदींनी पाठिंबा दिला आहे. संध्याकाळी सहकार क्षेत्राचे महाले, नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी मध्यस्थी करून तीस तारखेपर्यंत ठेविदाराचे पैसे परत मिळतील असे आश्वासन दिले त्यानंतर उपोषण कर्त्यानी धरणे आंदोलन मागे घेतले


0 Comments