शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-तालुक्यातील शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असणाऱ्या सुकवद व निरघुडी शिवारात बिबट्याचा प्रवेश झाला असून जनगलातील शेतकरी मालकीची दोन वासरे व दोन शेळ्यावर त्याने हल्ला केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
दोन दिवसापूर्वी तापीकाठावरील सुकवद परिसरात त्याने आपले अस्तित्व निर्माण केले होतें त्यात शेतकरी राजेंद्र धनगर हयाच्या शेतात एक बिबट्या व दोन लहान बछडे आढळून आल्याचे सांगितले तर आज सुकवद शिवाराला लागून निरघुडी शिवाराकडे आपला मोर्चा वळवला आहे. येथील शेतकरी कमलसिंग बुवाभाई गिरासे यांच्या मालकीचे दोन वासरे यांची शिकार त्याने केली आहे तर मीराबाई राजेंद्र ठाकरे यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांवरही हल्ला करून जखमी केले आहे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर भयभीत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे आज दिवस भर शेतकरी गावकरी बिबट्याचा माग काढत शोध घेत असल्याचे समजते.हयावरुन शिंदखेडा येथे वनविभाग ह्याच्या कार्यालयात शिवसेनेच्या उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा वळविण्यात आला. त्यात सुकवद व परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग विभागाने त्वरित बिबट्या चा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी तसेच ठिक ठिकाणी लोखंडी जाळे बसविण्याची मागणी देखील ह्यावेळी केली.त्यानंतर वनविभाग कार्यालयात अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हया संदर्भात त्वरित कार्यवाही न केल्यास शिवसेना स्टाईल ने वनविभाग कार्यालयात तिव्र स्वरुपात जन आंदोलन उभारले जाईल असा ईशारा ह्यावेळी दिला. स्वातंत्र्य मिळुन पच्चाहत्तर हुन अधिक वर्ष झाली तरी वनविभाग व अन्य कार्यालयात प्रमुख अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाही म्हणून नागरिकांना अनेक समस्यांचे निराकरण कोण करणार कुणाकडे दाद मागितली जावी असाही आरोप ह्यावेळी करण्यात आला. हया प्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील,सागर देसले, नंदकिशोर पाटील, दिलीप पाटील, विजय पाटील, राजेंद्र धनगर,रविंद्र पाटील, ज्ञानेश्वर धनगर,शाम भिल, समाधान भिल,वसंतराव पाटील,रितीक पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments