निवेदनात म्हटले आहे, की देवपूर भागात १३१.५४ कोटींच्या निधीतील भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. ठिकठिकाणी काम निकृष्ट व तांत्रिकदृष्टया अयोग्य आहे. वाटेल तसे रस्ते खोदणे, चेंबर तयार करणे आदींमुळे अनेक समस्यांना निमंत्रण मिळाले. त्यामुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. बोगस पद्धतीच्या चेंबरमुळे व करारानुसार रस्ते न झाल्याने अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत.
देवपूर भागात एकूण २४ नगरसेवक आहेत. पैकी १९ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यातील एकानेही आजपर्यंत या विदारक स्थितीबाबत आवाज उठवला नाही. यामागचे गौडबंगाल काय असावे? भुयारी गटार योजना १४७ किलोमीटरची असून, आतापर्यंत १२५ किलोमीटरचे काम झाल्याची माहिती आहे. उर्वरित २२ किलोमीटरचे काम शिल्लक आहे. आतापर्यंत ठेकेदाराला ९८ कोटींचे बिल अदा झाले आहे. योजनेसाठी आता फक्त ३६.५४ कोटींचा निधी शिल्लक आहे. गुजरातच्या ठेकेदार पटेल कंपनीने प्रॉपर्टी चेंबर व मेन चेंबरच्या कामापोटी २८ कोटींच्या बिलाची मागणी केली आहे. शिल्लक ३६.५४ कोटींतून २८ कोटी अदा झाल्यास फक्त ८.५४ कोटींचा निधी शिल्लक राहील. त्यात २२ किलोमीटरचे काम शक्य नाही. त्यामुळे किमान ३० ते ४० कोटींचा खर्च अपेक्षित असेल.
---

0 Comments