Header Ads Widget

उघडा डोळे वाचा आणि विचार करा रे 👇👎 *भारतात 1150 वृद्धाश्रम आहेत; पण यात एकही मुसलिम नाही, असे का ?* सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. काय म्हटले आहे त्यात पाहूया



काय तर म्हणे आपली संस्कृति जगांत महान आहे. बिनबुडाचा असला नेहमी दावा केला जातो. हिंदू संस्कृती महान संस्कृती कशी काय असू शकते. भारतात महाराष्ट्राला सर्वात पुरोगामी मानले जाते पण हे सपशेल खोटे आहे.

पहा एका अहवालानुसार भारतात ११५० वृद्धाश्रमे आहेत व या वृद्धाश्रमांत ९७ हजार वृद्ध लोक राहतात. महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गंत विना अनुदान तत्वावर चालवले जातात. स्वत:ला सुसंस्कृत समजले जाणा-या पुण्यात सर्वात जास्त म्हणजे ६५ वृद्धाश्रमे आहेत.

महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. पैकी १ कोटी वृद्ध लोक आहेत. हिंदूंना लाज वाटली पाहिजे की समाजाला वृद्धाश्रमांची का गरज पडली. आई वडिलांना न संभाळण्याची कुवृत्ती समाजात‌ वाढलेली दिसून येते.

या ठिकाणी मुद्दाम नमूद करावे वाटते की, भारतातील सर्वच्या सर्व म्हणजे ११५० वृद्धाश्रमांत एकही मुस्लिम वृद्धाश्रम नाही. अहवालानुसार मुस्लिम समाज आईवडिलांना उत्तम सांभाळतात व त्यांची देखभाल चांगली करतात. कुराणमध्ये अल्लाह नंतर आईवडिलांच्या चरणी जन्नत आहे असं ते समजतात. त्यामुळे मुस्लिम समाजाचा एकही अगदी नावांलाही वृद्धाश्रम नाही. आणि तशी गरजही नाही पडली.

मात्र हिंदू समाजाचे सर्वत्र जिकडे तिकडे अनाथाश्रम व वृद्धाश्रम दिसून येतात. तसेच सरकारलाही वृद्धाश्रम काढण्याची आवशकता भासणे ही अत्यंत लाजीरवाणी व शरमेची बाब आहे. वृद्धाश्रम व अनाथाश्रम हा हिंदू संस्कृतीवरचा कलंक आहे. आपले आई वडील मुलांना जड व्हावेत इतकी नीच वृत्ती समाजात वाढली आहे.

पुणे या बाबतीत तर नंबर एक वर आहे सर्वात जास्त वृद्धाश्रम पुण्यांत आहेत.   मा. पंतप्रधान मोदीजींनी १०० जिल्ह्यांत वृद्धाश्रम उघडण्याची घोषणा केली आहे. किती शरमेची ही बाब आहे.. हा विकास असतो का?

वैद्यकिय शास्त्रांतील प्रचंड प्रगतीमुळे नवसंशोधनात्मक उपचारांने वयोमानांत वाढ झाली आहे. पण माणसांतील ओलावा मात्र पार आटला आहे. लोकांच्या घरातील कुत्रे गलेलठ्ठ झाले आहेत आणि मातापिता आठ आठ दिवस उपाशी आहेत. काय झालंय काय गाबडयांना यासाठीच का जन्माला घातले होते का त्यांनी.

शांतपणे विचार करा एवढ्या देशांत एकही वृद्धाश्रम मुस्लिमांचा नाही यावरुन काय बोध घ्याल बोला?

श्रावणबाळ योजना आणावी लागते.

संजय गांधी निराधार योजना राबवावी लागते.

कुठे तो श्रावणबाळ, कुठे आजची बिलंदर बाळे.

बरेचसे बैलोबा म्हणतात बायको ऐकत नाही. ती आणि तू सुद्धा एक दिवस म्हातारे होणार आहातच ना. हे विसरू नका

पोरगा शिकला न् जन्मदात्यांनाच विसरला.

कशाला जन्माला घालायची असली अवलाद त्यापेक्षा बिन औलादीचे रहा काय हरकत आहे.

सामाजिक जबाबदा-या शिकवल्याच जात नाहीत, आणि एक मुलगा एक मुलगी पॅटर्न आल्याने काय झाले एकुलता एक म्हणून दिवट्याचे फारच लाड होत आहे तोच घातक ठरत आहे.

आई-वडील एकच दिवटा आहे म्हणून मुलांच्या अनेक चुका नजर अंदाज करत असल्याने ते गाबडं उदंड आणि उनाड होत चालले आहे. जरा आवरा लाडल्याला नसता हा लाडला तुम्हांलाच लावील धक्क्याला.

संस्कार द्या तरच वृद्धाश्रम कमी होतील नसता भयानक वास्तव आ वासून येत आहे. लक्षांत ठेवा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
   श्री गणेश परसरामजी जोहरे 
    नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष 
      राष्ट्रीय मानव अधिकार,
             नवी दिल्ली.

Post a Comment

0 Comments