Header Ads Widget

*आविष्कार संशोधन स्पर्धेचा जिल्हास्तरीय मान शिंदखेडा येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाला- विविध समित्या स्थापन*




शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी --
 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेच्या आयोजनाचा मान शिंदखेडा येथील एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालयाला मिळाला असून स्पर्धेचा शुभारंभ मंगळवार 


दि.१८/१०/२०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता अमळनेर येथील धनदाईचे प्राचार्य व  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
             कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वेगवेगळ्या जिल्हास्तरावर व विद्यापीठात अशा प्रकारे अविष्कार स्पर्धा घेण्यात येत आहे. यात धुळे जिल्ह्याची स्पर्धा शिंदखेडा येथील एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालयात संपन्न होत आहे.
        या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अध्यक्ष  म्हणून आमदार कुणाल पाटील येणार आहेत.तसेच महाविद्यालयाच्या स्थानिक कार्यकारिणीचे चेअरमन प्रफुल्लकुमार सिसोदे, व्हा.चेअरमन अशोक पाटील,  महाविद्यालयाच्या स्थानिक कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद समितीचे सदस्य दिलीप रामू पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
      या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील २९ महाविद्यालयांमधील ४७३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यात ४३ मॉडेल व ४३० पोस्टर सादरीकरण होणार आहे.ही  स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, संशोधक विद्यार्थी व शिक्षक अशा चार विभागात होणार असून पोस्टर, मॉडेलव्दारे विद्यार्थी आपल्या संशोधनाचा विषय मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत सादर करणार आहे.ही स्पर्धा धुळे , नंदुरबार,  जळगाव येथेही पार पडणार आहे. या स्पर्धेत महाविद्याल, विद्यापीठ, राज्य , राष्ट्रीय असे स्तर असतात. यांतील सर्व निवडलेल्या गटाला गुणदान करणेसाठी व निरीक्षक म्हणून विद्यापीठातील उच्च विद्या विभूषित अशा जवळपास ३० लोकांचा संघ येणार आहे.स्पर्धेत कोण निवडले गेले हे विद्यापीठात गुणांच्या अन्वये ठरत असते. 
          या स्पर्धेत सहा गट तयार करण्यात आले आहेत.त्यात पहिल्या गटात सामाजिकशास्त्रे, भाषा, मानव्यविद्या, ललित कला, दुसर्‍या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसर्‍या गटात विज्ञान शाखा, त्यात भौतिक शास्त्र, जीवन शास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणकशास्त्र आहेत. चौथ्या गटात कृषी व पशुसंवर्धन, पाचव्या गटात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सहाव्या गटात औषधनिर्माण शास्त्र यांचा समावेश आहे.
       स्पर्धेसाठी मुख्य नियोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य प्रा डॉ.तुषार पाटील असून समन्वयक म्हणून प्रा .डॉ.एन.एस.पवार, उप-समन्वयक म्हणून प्रा.डॉ.एस.के.जाधव, सदस्य म्हणून उप-प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.बोरसे, प्रा.डॉ.व्ही.एस.पवार, प्रा.एस.टी.राउळ हे आहेत. याशिवाय १८ उपसमित्या कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मदत संपर्क कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments